महाराष्ट्र
Trending

हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, 200000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय

भुसावळ दिनांक:- 16/09/2023
रात्री हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने खान्देशातील सर्वात मोठ्या असलेल्या हतनूर धरणाचे आज 6 वाजता 36 गेट उघडण्यात आले आहे.
हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे 41 पैकी 4 गेट पुर्ण व 32 गेट 1.50 मीटर असे एकूण 36 दरवाजे उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत
179895 cusecs इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत
200000 ते 250000 cusecs पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे.

तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button