मुंबईराजकीय

नवनीत राणांचं काय झालं ? भाजपने ना शिंदे गटाचं ऐकलं ना, ना बच्चू कडू यांच ऐकलं ,यांना दिली अमरावतीची उमेदवारी

मुंबई दि -27 मार्च,  मागील काही दिवसांपासून अमरावती या राखीव लोकसभा मतदारसंघात महायुती कोणाला उमेदवार देणार ? यावरुन प्रचंड खडाजंगी सुरू होती. खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये यासाठी शिंदे गटासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रचंड विरोध केला होता. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे भाजपच्या अमरावतीच्या स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध केला होता. असेही असतानाही भाजपने नवनीत राणा यांनाच अमरावती लोकसभेचं तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अमरावती मतदारसंघात यावरून मोठा वाद चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button