Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
जळगावपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठ्याच्या योजनांना गती देणार-पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि-०२/०१/२०२४, : पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पुन्हा एकदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी आज सांगितले आहे. शपथविधीनंतर आज मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वीकारला आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या विभागाच्या योजना यापूर्वीही प्रभावीपणे राबविण्यात आल्या असून प्रगतीपथावरील योजनांसाठी आवश्यक निधी वितरित करण्यात येईल. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन विविध कामांना गती देणार आहे. विभागाच्या माध्यमातून पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button