क्राईम/कोर्टमुंबईराजकीयराष्ट्रीयसंपादकीय

देशविघातक कायदा (NSA) अंतर्गत कैदेत असलेल्या दोघा खासदारांचे संसदेत उपस्थितीसाठीचे ‘पॅरोल’ फेटाळले

देशविघातक कृत्याच्या आरोपींना संसदेत 'नो एन्ट्री'

नवी दिल्ली,दि-15 जून 2024, सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकाल लागल्यानंतर सर्वप्रथम ‘मीडियामेल’ न्यूजने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत आणि देशविघातक कारवायांप्रकरणी कारागृहातून निवडणूक लढवून जिंकणाऱ्या दोन उमेदवारांचे धक्कादायक निकाल सर्वात आधी प्रकाशित केलेले होते.
  यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा गड मानला जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांना दहशतवादी कारवायांप्रकरणी देशातील सर्वात मोठ्या असलेल्या दिल्लीतील तिहाड कारागृहामध्ये गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याने जेलमध्ये राहून उमर अब्दुल्ला यांचा तब्बल 2 लाख 10 हजार मतांनी पराभव केल्याने जम्मू-काश्मीरसह देशभर मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दहशतवादी कृत्य आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारागृहाच्या कैदेत राहून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होता.त्याने प्रचाराच्या वेळी स्वतःचा प्रचार सुद्धा केला नव्हता. त्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात आलेलं असून देशभरातील प्रसार माध्यमांमध्ये या निकालाबाबत नंतर जोरदार चर्चा सुरू झाली होती.
अभियंता अब्दुल रशीद शेख असे या अपक्ष खासदार निवडून आलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याने तब्बल 4 लाख 70 हजार मते घेतलेली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना फक्त 261419 मते पडलेली आहे. हा देशाच्या निवडणूक इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर निकाल झाला आहे.

दरम्यान, दुसरा असाच एक धक्कादायक निकाल पंजाबमध्ये लागलेला असून देश विरोधी कृत्य आणि खलिस्तान चळवळीला पाठिंबा देऊन पंजाबमध्ये तरूणांना देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आक्षेपार्ह भाषणं दिल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) कायद्यान्वये आरोप झाल्याने आसामच्या दिब्रुगड कारागृहामध्ये न्यायालयीन कैदेत असलेला खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग हा त्याच्या पंजाब मधील खदूरसाहिब या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून तब्बल एक लाख 78 हजार मतांनी निवडून आल्याने पंजाबसह देशभरात मोठी खळबळ उडालेली आहे.
अमृतपाल सिंह याला तब्बल 3 लाख 76, 287 मते पडलेली असून त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंग जीरा यांना 198265 एवढी मते मिळालेली आहे.

वरील निवडून आलेले दोन्ही खासदार हे राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये आरोपी असल्याने त्यांच्या संसदेतील उपस्थितीमुळे सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

दोघा खासदारांचे जामीन कोर्टानं फेटाळले
निवडून आलेला अमृतपालसिंग याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात तर आणि अभियंता अब्दुल रशीद शेख याने जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात संसदेत उपस्थित राहून संसद लोकप्रतिनिधी म्हणून पदाची शपथ घेण्यासाठी आणी ते निवडून आलेल्या लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी तिन महिन्यांची पॅरोल रजा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र दिल्ली आणि दिब्रुगड या दोन्ही ठिकाणचे अनुक्रमे विभागीय आयुक्त आणि कारागृह उपमहानिरीक्षक यांनी वरील दोन्ही  कैद्यांचा विनंती अर्ज हा नियमात बसत नसल्याने फेटाळून लावलेला होता. राज्यघटनेनुसार मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक ही राज्यघटनेची मूलभूत रचना आहे, आणि त्यानुसारच न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि दोषसिद्धी न झालेल्या बंद्यांना निवडणूक लढवता येते. त्यानुसार संबंधित उमेदवाराच्या मागणीवरून त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आणि त्या संबंधीची सर्व प्रक्रिया आम्ही यापूर्वी पार पाडून त्यांना सहकार्य केलेले आहे. आणि संबंधित आरोपींनी सार्वत्रिक निवडणूक 2024 ही निवडणूक प्रक्रियेनुसार लढवलेली आहे. परंतु कोणत्याही उमेदवाराला इतर वैधानिक निर्बंधांचे उल्लंघन करून स्वतःसाठी कॅनव्हास करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. असे विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अहवालात म्हटलेले आहे.त्यामुळे आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त आणि कारागृह उपमहानिरीक्षक यांचा अहवाल तपासल्यानंतर निवडून आलेल्या दोन्ही उमेदवारांची पॅरोल रजा रद्द करण्याचे आदेश कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे आता वरील दोघांना पावसाळी अधिवेशनात संसदेमध्ये उपस्थित राहता येण्याची शक्यता कमी आहे. तसेच येत्या साठ दिवसांच्या आत त्यांची संसदीय कामकाजासाठी संसदेमध्ये उपस्थिती आढळून न आल्यास त्यांना अपात्र करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्ष यांना असल्याने त्यांची संसद सदस्यता आता रद्द होण्याची शक्यता वाढलेली आहे.
पॅरोल आणि फर्लो रजा म्हणजे काय ?
कैद्याला सजा भोगत असताना दोन प्रकारच्या रजा मिळू शकतात; (1) अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल (parole) व (2) संचित रजा म्हणजे फर्लो (fourlough). या दोन्ही रजा या फक्त सिध्ददोष झालेल्या बंद्याना मिळू शकतात म्हणजे ज्या बंद्याना मा. न्यायालयाने गुन्ह्याची दोष सिद्धी झाल्याने सजा दिलेली आहे असे बंदी. या दोन्ही रजा न्यायप्रविष्ट बंद्याना दिल्या जात नाही, म्हणजे जे बंदी न्यायालयीन निकालाच्या प्रतिक्षेत असतात व त्यांना जामीन न मिळाल्याने कारागृहात असतात असे बंदी.
पॅरोल म्हणजेच अभिवचन रजा ही दोन प्रकारे मिळते. (1) महसुल विभागाचे विभागीय आयुक्त यांना ही रजा मंजूर करण्याचे अधिकार असतात. समर्पक कारण असेलतर शिक्षा झालेल्या बंद्याला ही रजा मंजूर केली जाते. सुरूवातीला एक महिना ही रजा मंजूर होते तद्नंतर ती तीन महिन्यापर्यंत वाढविता येते. (2) ज्या बंद्याचे जवळच नातेवाईक मृत झाले असल्यास त्यास 10 दिवस ही पॅरोल रजा संबंधित कारागृह अधीक्षक हे मंजूर करतात. या रजेचा कालावधी शिक्षेत गणला जात नाही म्हणजे जितके दिवस रजेवर तितके दिवस शिक्षेचे दिवस वाढतात.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button