Advertisement
अर्थकारणकृषीजळगावनोकरीमहाराष्ट्रमुंबईराजकीय

बोगस दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार तडकाफडकी निलंबित करणाऱ्या जि.प. सीईओ करनवाल यांची तडकाफडकी बदली

एका लॉबीच्या दबावामुळे सरकारने बदली केल्याची चर्चा

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिकच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषद सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मिनल करनवाल या २०१९ बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत असताना विविध क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केली. ग्रामीण आरोग्य सेवा मजबूत करणे, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच पाणीपुरवठा आणि ग्रामविकासाच्या योजनांना गती देणे यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या कार्यकाळात अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. विशेषतः एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जिल्ह्याने राज्यस्तरावर आघाडी घेतली, ही बाब त्यांच्या प्रशासनिक नियोजन आणि समन्वय क्षमतेचे उदाहरण मानली जाते.
याशिवाय, प्रशासनात पारदर्शकता वाढवण्यासाठी त्यांनी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवला, नागरिकांशी थेट संवाद साधणारे उपक्रम राबवले आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधून कामकाज अधिक गतिमान केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर उल्लेखनीय स्थान प्राप्त झाले. दरम्यान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) हा राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पाद्वारे शाश्वत शेती, जलसंधारण, मृदसंवर्धन आणि हवामान बदलाशी सुसंगत कृषी पद्धतींना चालना दिली जाते. या पार्श्वभूमीवर मिनल करनवाल यांचा अनुभव या प्रकल्पासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. तर दिव्यांग कल्याण सक्षमीकरण करण्यासाठी शासन निर्णयानुसार त्यांनी धडाकेबाज कारवाई करत, दिव्यांग चाचणीत अल्प किंवा बोगस असलेल्या तब्बल ३२ कर्मचाऱ्यांना थेट तडकाफडकी निलंबित केले होते. जे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक होते.
तर नव्याने रूजू होणाऱ्या करिश्मा नायर या २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्या यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. शहरी प्रशासनातील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रूपाने जिल्हा परिषदेला नवे नेतृत्व मिळाले असून, ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच मिनल करनवाल यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आणि कारवाया अधिक प्रभावीपणे पुढे नेल्या जातील, असा विश्वासही व्यक्त होत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp